Saturday, November 22, 2008

कै श्री वमन नारायण जोशी ह्यन्चे आत्मकथन
तिर्त्थरुप किर्तीरूप आमचे काका दाजी काका उर्फ वामन नारयण जोशी सम्शेर्पुर्कर देश्भक्त हिन्दुत्वनिश्थ त्यग्मुर्ती आमचे काका आप्तेश्ठान्चे व गावक यान्चे दाजि काका ज्यानी देशाच्या स्वतन्त्र्या करीता वयाच्या १९ व्या वर्षी स्वतन्त्र्य लढ्यात धाड्सी पाऊल टाकले .नाशिक ला वि दा सावरकरान्च्या प्रेरणे ने इन्ग्रज सरकार्च्या विरुद्ध एक गुप्त सन्था स्तापित केली होती .त्यन्चे ते एकनिश्ठ सदस्य होते . आम्च्या काकानी स्वहस्ते लिहुन थेवलेले आत्मकथन .
माझे रहाण्याचे गाव अहमद्नगर जिल्ह्यातील समशेरपूर तलुक्यातील धान्धर्फळ येथे मझ्या मामान्च्या गावी गेले . तेथे दिड वर्ष राहिलो परन्तु तेथे हेमास्टर नियमित शाळेत येत नसे .त्यामुळ तेथील शाळेची दोन वर्ष फुकट गेली .त्या दिवसातच आम्च्या वडिलन्चे दुखद निधन झाले . प्रपन्चा चा भार अम्हा तीन भावन्डन्वर पडीला . १९०७ मधे नाशिक च्या पन्चवति शळेत प्रवेश घेतला . त्यावेळी व्हा फ़ैनेल च्या परिक्शेत नाशिक जिल्ह्यात आथव क्रमन्क आला .१९०४ सालीच समशेरपुर ला विदेशी वस्तुन्ची होळी केली होती . त्य दिवशी केसरि काळ व भाला नावाचे वर्तमान पत्रे वाचायला मिळ्त. त्य वेळे पासुउन मी स्वातन्त्र्य चळ्वळिइने प्रेरित ज़ालू होतू.पन्चवटी शाळेत मी मास्तर असताना गण्पती उत्साहातिल व नवरात्रितील देश्भक्तिवर गाण्यान्ना बन्दी घातली होती .त्यामुळ शिक्शक सहकर्याना विध्यर्थान चे व पोलिसान्चे सन्घर्श सुरु झाले . त्यात चळ्वळी चे प्रमुख अण्णा परान्जपे व बाबा खरे याना पकडले. ह्या दोघन्च्या खतल्या च्या कमा करीता लोक्मान्य टिळक मुम्बईत होते .त्यान्चा च्या वरही खटला भरला होता .नशिक येथे एका गाडीवानाला इन्जिनीयर विलियम ने एका लहानशा चुकी मुळ लथा बुक्क्यानी मरे परियन्त तुदविले . जॆक्सन ने त्याला खोटा पन्चनामा करुन वाचविले. ह्या अन्याया मुळ नशिक ला स्वतन्त्र्य चळ्वळी ची ज्योत अधिकच भडकली.त्यच कळात कलेक्टर ने गागापुर च्या शेतकरान्ना जेमीनी तगायि पोटी कधल्या होत्या .ह्या अत्याचरान्न उत्तर देण्या साठी आम्ही एक गुप्त सन्स्था स्थापन केली .त्यात मझ्या बरोबर क्रुश्णाजी पन्त कर्वे ,विनयक देशपान्डे ,शन्कर सोमन अ माल पथक हे हे होते .आम्ही सर्वन्नि छत्रपति शिवाजी महाराजान्च्या चित्रा च्या पायान्वर हात ठेवुन "जे जे कही मला करावे लागेन ते ते मी शारिरीक व मानसिक कशाही परिस्थितित ते ते मे करेन.व त्या करिता अजन्म यथाशक्ति प्रयत्न करेन व गुप्त गोष्टी बाहेर फोडणार नाही .अशी शपथ घेतली.सन्स्थे ची जाग नशिक च्या नाव दरवाज्या जवळ होती .सन्थेत बोम्ब तैयार करायचे ठरविले .पण तेय पुर्ण झाले नाही . अनन्त कान्हेरे ह्या ह्या सतरा वर्षा च्या तरुणा शी माझी ओळख झाली .हा औरन्गबाद येथे रहात होता . जॆकसन च्या अत्याचारान मुळ अनन्ता सन्तापाने पेटुउन उठला व म्हणाला "मी येथे असतो तर त्याच्या चिन्ध्याच उडविल्या असत्या.त्याचे बोलणे प्रेरणादायी ठरले व त्याच वेळी कलेक्टर च्या वधाचा विचार आमच्या मनात पक्क झाला .होण्यार्या सर्व गोष्तिन्च्या परिणामाचा विचार करुन अम्ही पाउल न डगमगता धाडसी मनाने त्याचा स्वीकार केला .काही दिवसात जक्सन ची बदली नशिक हुन मुम्बई ला झाली .त्यावेळी अनन्ता औरन्गाबा हुन नाशिक ला आला . इन्ग्रजान विरुद्ध काय करायचे आहे ते अत्ताच करिता ये ई ल हा विचार ठाम होता . आमचे जेष्ठ सहकारी श्री कर्वे ,श्री देश्पान्डे,श्री सोमण ह्यानी सर्व गोष्टीन्ची जुळवाजुळव केली. अनन्त कान्हेरे वयाच्या मानाने भक्कम ,सुन्दर ,मोहक व सडसडीत होता .जळत्या कन्दिला ची आग हतात धरुन त्यने सिद्ध केले .
kramash:

Friday, September 26, 2008

गीत


दाटला काळोख होता चहु दिशान्नी,
नीरवाचा शाप होता वेदनेला.
त्याच काळोखातूनी पण सूर आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

आसवे माझीच माझ्या मालकीची,
अन त्यांना मूक सारे सोसण्याचि।
गाठुनी एकान्त त्याना फीतूर केले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

लपिविला एक वणवा अन्तरात
अन निखारयाचीच होती पयवाट.
नकळत पण अग्नि ला त्या फूल आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

--------- अनामीक----------------

Wednesday, September 24, 2008

वुड रोज


एप्रिल २२ २००८
वुड रोज
हिरकणी (मंगळ।, २२/०४/२००८ - १०:१२)
संध्याकाळच्या वेळी कोवळी उन्ह पडली होती। सहज मी फिरायला निघाले.फिरता फिरता दूर कुठवर एक मंद सौम्य सुवास येऊ लागला.मी त्या सुवासाच्या दिशेने चालत गेले .पुढे बघते तर काय ?मैलो न मेल पसरलेली गावठी गुलाबाची बाग होती पलिकडे. मी जेवढी जवळ गेले सुगंध तेवढंच दरवळू लागला चहू दिशेने. असे वाटले की एका बाटलीत हा सुगंध भरून सांभाळून घरी घेऊन जावे....पण सुगंध असा बंदिस्त करता येत नाही .तो तर दरवळत राहणार खुलून राहणारा गंध.
मग मनात विचार आला की गुलाब केव्हा रोज हे फूल एवढे लोकप्रिय का?अस दडलंय काय ह्या फुलात?मला फुलांविषयी खूप प्रेम आदर आणि कुतूहल आहे.माझे वडील देव पूजा करते वेळी हजार प्रकारची ताजी टवटवीत फूल आणत.त्यांतले वेगळे फूल ते मला आवर्जून दाखवत व त्या फुलाचे वैशिष्ट्य सांगत. ही दुसऱ्याला जाणून घ्यायची कलाच आज मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली.गुलाबाविषयीचे कुतूहल पण त्यांच्यामुळे मिळाले।
कोणताही असो पांढरा पिवळा लाल गुलाबी किंवा वुड रोज, फुलांचा राजाच तो.परंतू ह्या राजाला असतात हजार काटे.... ह्या काट्यांमुळे गुलाब असेल कदाचित वेगळा .एवढ्या सुंदर फुलाला काटे का पण?हे काटे असतात आडकाठे..सौंदर्याचे आडकाठे. एखाद्या सुंदर स्त्रीच्या गालावर तीळ असतो तसा.एखाद्या राणी मधमाशी भोवती हजार मधमाश्या असतात तसे.राजाची ती सेनाच. म्हाताऱ्या माणसाची काठी तसे हे काटे. कुठलीही सुंदर वस्तू जर उघड्या वर पडली तर तिला बघून आपण सुरक्षित ठिकाणी ठेवतो तर काही जण विध्वंसही करतात त्या सौंदर्याचा.म्हणूनच हे काटे.
कष्ट करायला व कष्टांची कदर करायला पण शिकवतो.खाली हजार कष्टांची काटे असले तरच सदाबहार गुलाब येतो. अर्थात ध्येय असलेल्या कष्टांचेच चीज होते.फाटे फुटलेल्या कंदा ला गुलाब येत नाही बरं का! गुलाबा ला बघून आईचीच आठवण होते. एका गृहिणीची आठवण. गुलाब जसा काटे घेऊन फुलतो ती पण तिच्या संसारात राणी सारखी डुलत राहते.तिला फुलोरा आणावाच लागतो संसाराच्या वाळवंटात.ती घराला सुगंध देतच राहते काट्यांमध्ये राहून.
आठवण करून देतो गरिबीची. गरिबीत राहणाऱ्या हजार हसऱ्या स्वावलंबी लोकांची.काट्यात राहून असे इतरांना सुख देणे सोपे नाही बरं.तसेच असते वुड रोज ह्या जातीचा गुलाब काश्मीर राज्यात मिळतो. वरून खालपर्यंत जणू कोरीव लाकूड.लाकडाचे पण गुलाब असते त्याला वुड रोज म्हणतात. सगळ्या लोकांच्या मना वर राज्य करणारे गुलाबचे फूल किती ऋणी आहोत आपण त्याचे.
ह्या गुलाबच्या माळ्या चे पण नवल वाटते .खुलेपण देऊन विशसाने सातत्याने परिश्रमाने त्याला फुलवावे लगते. एक न संप णारा न खचणारा आधार द्यावा लागतो गुलाब फुलवायला. चला तर मग आपल्या साठी एक गुलकंदी विचार रिजवुनी घेऊया आणि गुलाब फुलवूया आपल्या आयुष्या चा आणी चिमुकल्या जीवांचा आधार बनूयात.

प्रवास


गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...
गंध माझेच रोखुनी मी आले...
अश्रू माझेच वेचुनी मी आले...
मायेची ती शीतल छाया
आता कुठे हरपली...?
आपुलकीची पायवाट ती
आता कुठे हरवली...?

माणसेही ती जिव्हाल्याची
आता कुठे पांगली...?
.....जन्म नव्याने पुन्हा घ्यायला...
पुन्हा नव्याने मोहरायला...

अतृप्त आत्मा एक जणू मी
आले आईचे हृदय शोधायला...

प्राजक्त हा ईश्वरी.... तयाचा
जन्म इतरांना सुखावायालास
सुकला -कोमेजला जरी हा...
फुलेल पुन्हा तरुवरी शोभायला...

जन्म नवा घ्यायला...
श्वास नवा रुजवायला...
आकाषी परत नवे
नक्षत्र नवे सजवायला...

गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...

आपुला हिशेब चुकला


तेव्हाच नाही नाही म्हणतले, होकार आज कुठला
दोघात जणतोना आपुला हिशेब मिटला.
मिटला हिशेब म्हणता हसते हळूच कोणी
तू मी असेल कैसे, होणे न हे मुळीच।

मिटला हिशेब म्हणशी मग का असे पहाणे?
डोळ्यात मेघ आहे ऒठान्वरी बहाणे


हे मौन जीवघेणे कासाविस अशी का ? लपाव्या उसासा बाजूस पाहशीका

आपुला हिशेब चुकला आहे कबूल

माझे गणीत कच्चे हातचा चुकुन राही

आन चक्रवादाने जे झाले अमोल देणे
मिर्वीन जन्मोजन्मी शिरी हे अबोल लेणे।


---जुन्या डायरीत सापडलेली कविता---

मृगजळ


एका मृगजळी हरवून गेले मी
त्या पाण्यात पोहून गेले मी
त्या वाळवंटात भाजून निघाले मी
त्या वाऱ्यात गारठून गेले मी


मृगजळ कधी दिसले नाही
पण वेड लावले त्याने मला
त्या मृगजळं च्या शोधात
विद्रूप विद्रोही झाले मी

मग जळ मिलाळे खरे
तृप्त मनी भिजून गेले मी
मग आरशात पाहिले मी
अन मलाच भेटले मी

मृगजळ मध्ये तापून हरवून
भाजून निघाले मी
पण थोड्याशाचं जळा मुळं
सुखावुनी गेले मी

कोणा कसे सांगवे
पण संगावसे वाटते खरे
अथांग चंचल मृगजळा पुढ
दव बिंदू रुपी जळच खरे

शोधता शोधता जे सापडत नाही
ते असते मृगजळ
आशा आकान्शा चे मृगजळ
भरकटून टाकणारे मृगजळ

केव्हा ही कधीही दिसते
ते आहे जळ
आपल्या जीवनाचे अमृत
जीवन फुलवणारे खरे जळ

मृगजळा च्या शोधात
हरवू नकोस माणसा
दव रुपी अल्प आनंदांचा
आस्वाद घ्यायला विसरू नकोस माणसा.

Tuesday, September 23, 2008

विरह

नकोच होते तुज माझे
प्रकाशाचे चांदणे .
वेडच होते प्रेम माझे
सदा सर्वदा आंधळं.

नकोच होता श्वास माझा
नकोच होती बंधने .
पैलतिरी दिसलीच नकळत
आठवणींची स्पंदने.

नकोच होते तुज माझे
स्वप्नांचे नांदणं .
वेचत बसले मी मनी बस
प्राजक्ता चे चांदणं .

प्रश्न पडतो एकच तेवढा
तू नसे जवळ तेधवा .
नकोच होते तुज मी जर
का स्मरते मला आजपण?

दूर कुठवर जळती ज्वाला
इथं का बरसी श्रावणधारा?
दूर कुठवर तेजस्वी चंद्र
इथं चांदणी का फुलवी रंग?